BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

येथे पावसाने घरातच पाण्याचे उमाळे;खायचं कसं अन् झोपायचं कसं?

शिराळा: कोकणेवाडी ता.शिराळा येथील घरांमध्ये पावसामुळे पाण्याचे उमाळे प्रवाहित होऊ लागल्याने येथील घरेच धोकादायक बनू लागली आहेत.त्यामुळे पावसाळ्यात स्वयंपाक करायचा कसा अन् झोपायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो.गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या वाडीतील अनेक घरात अंतर्गत पाण्याचे उमाळे प्रवाहित होऊन घरातूनच पाण्याचे पाट काढून पाणी बाहेर काढण्यात आले.अद्याप त्या घरात पाण्यामुळे ओलं आली असल्याने चूल पेटवता येत नाही. जमिनीवर झोपता येत नाही.एका कॉट अथवा पलंगावर जास्ती जास्त तीन माणसं झोपू शकतात.मात्र घरात तीन पेक्षा जास्त लोकं असतील  उर्वरीताना अर्धी रात्र जागून काढावी लागते. त्यानंतर झोपले उठून जागे असणारे झोपतात.तर ज्यांच्या घरी ओलं नाही त्यांच्या घरी झोपण्यासाठी जावे लागते. जनावरे गोठ्यात असणाऱ्या ओलीतच बांधावी लागतात.

ही वाडी डोंगरावर व डोंगर पायथ्याशी आहे. मातीची घरे असल्याने डोंगरात मुरणारे  व पावसाचे  पाणी यामुळे घरात अंतर्गत उमाळे प्रवाहित होऊ घर हे गटात बनू लागले आहे. घरात उमाळे प्रवाहित होऊ लागल्याने ते पाणी घरातच चर मारून बाहेर काढावे लागत आहे. चूल पेटवत येत नाही.धान्यांची टोपली ही भिजून जात आहेत.मातीची घरे असल्याने घरात पाणी मुरून ती घरे ही कमकुवत बनत आहेत.अशा घरात रहाणे हे ही धोकादायक आहे.त्यामुळे या ठिकाणी घरात पाण्याचे उमाळे प्रवाहित होऊ नयेत यासाठी योग्य ती उपाय योजना करणे गरजेचे आहे.



या पावसानं आमचं जगणं हैराण केलं आहे.

बाहेर वारा आणि पाऊस अन् घरात पाणी यामुळे आमचं जगणं हैराण झालं आहे.घरातच झऱ्या सारखे पाणी  वाहू लागल्याने आमच्या चुली पेटत नाहीत.घरात धान्य असून काहीवेळा अन्न शिजत नाही.झोपण्यासाठी कॉट चा आधार घ्यावा लागतोय. पण एका कॉट वर किती माणसं झोपणार अशी खंत ८० वर्षीय भिवाजी उजगावकर यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments