
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अभ्यासू व राजकीय प्रदीर्घ अनुभव असणऱ्या माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदीची जबाबदारी दिली आहे.त्यामुळे नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा उजाळा मिळाला आहे.नाईक यांच्यावर राज्याची जबादारी दिल्याने नाईक समर्थक व कार्यकर्ते यांच्या नव्याने उत्साह संचारला आहे.त्यांच्या अनुभवाचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस वाढीसाठी पोषक ठरणारा आहे.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,प्रफुल्ल पटेल यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना तसे निवडीचे पत्र दिले आहे. शिवाजीराव नाईक यांनी जिल्हापरिषद पासून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली आहे. १९९५ ला त्यांनी अपक्ष लढून युती शासनाच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केले आहे.सांगली जिल्हा परिषदचे ११ वर्षे अध्यक्ष तर चारवेळा आमदार म्हणून काम केले आहे.त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात राजकीय अनुभव आहे.त्यांच्याकडे असणारी अभ्यासू वृत्तीने व आपल्या संभाषण कौशल्याने ते प्रत्येक अधिकाऱ्यांची मने जिंकून घेत आले आहेत.त्यामुळे ते पदावर असले अगर नसले तरी त्या ओळखीने त्या अधिकाऱ्यांच्या कडून लोकांची असणारी कामे न्यायिक पद्धतीने करून घेत आहेत.
नाईक यांचे प्रतिस्पर्धी असणारे व अलीकडे घट्ट मैत्री झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना शह देण्यासाठी त्याच तोडीच्या राजकीय अनुभव असणऱ्या नाईक यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पावर यांनी नाईक यांना संधी देऊन वेळीच व्युव्हरचना आखली आहे.त्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात नाईक यांच्या विचाराचे लोक आणून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात बळकट करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे.आपल्या जुन्या अनुभवी नेत्यांला प्रदेश उपाध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिल्याने नाईक यांचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. स्व.शिवाजीराव देशमुख यांनी ही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भूषवले आहे.त्या नंतर नाईक यांना मिळालेले प्रदेश उपाध्यक्षपद हे शिराळा तालुक्यासाठी व शिराळा विधानसभा मतदार संघातील जनतेसाठी अभिमानाची बाब आहे.
साहेबांचा शब्द दादांनी पाळला
शिवाजीराव नाईक यांची अभ्यासूवृत्ती आणि त्याचे कार्यकर्तुत्व पाहता त्यांना जिल्ह्या पुरते सीमित न ठेवता त्यांचा राज्याला कसा उपयोग करता येईल याचा विचार जयंतराव आपण बसून करूया.ते या मतदार संघाच्या विकासासाठी आपल्या घरी येत आहेत. घरची उभारणी करणे, त्याचे रक्षण करणे व विकासाचे सूत्र स्वीकारून स्वग्रही आलेत त्याबद्दल त्यांचे स्वागत असल्याचे मत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी शिराळा येथे शिवाजीराव नाईक यांनी गुढीपाडव्याच मुहूर्तावर २ एप्रिल २०२२ राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये केलेल्या पक्ष प्रवेशावेळी केले होते.मात्र तीन वर्षात त्या बद्दल काहीच हालचाल झाली नाही.मात्र त्यांचा सन्मान करण्याचा शरद पवार साहेबांनी दिलेला शब्द मात्र अजितदादांनी पाळला.
0 Comments