शिराळा,ता.१०:शिराळा तालुका हा नागपंचमीच्या माध्यमातून जागतिक पर्यटनाचे केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.शैक्षणिक आणि धार्मिक प्रबोधनाच्या माध्यमातून परवानगी मिळाली आहे.पुढील काळात आणखी चंगल्या पद्धतीने आपणाला नागपंचमी साजरी करण्यासाठी काही बांधणे घालून घ्यायला हवी असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथे २३ वर्षे नंतर प्रबोधनासाठी जिवंत नाग पकडण्याची परवानगी केंद्र व राज्य सरकारकडून मिळवून दिल्याबद्दल आमदार सत्यजित देशमुख यांचा गोरक्षनाथ मठाचे योगी पीर पारसनाथ महाराज यांच्या हस्ते आयोजित भव्य नागरी सत्कार प्रसंगी बोलत होते.यावेळी आमदार विनय कोरे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, ,सांगली जिल्हा बँकेचे संचालक चिमन डांगे,संपतराव देशमुख,ॲड भगतसिंग नाईक,हणमंतराव पाटील,माजी नगरसेवक केदार नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले,महाराष्ट्राच्या विकास पाटलावर हा मतदार संघ सर्वांच्या सहकार्यातून आणू.माझा शिक्षण,आरोग्य,आणि पर्यटनावर विशेष भर आहे.
खासदार धैर्यशील माने म्हणाले,२३ वर्षाच्या वनवासा नंतर शिराळ्यात कोणाच्या माध्यमातून यायचं हे नागदेवतेने ठरवले होते.यासाठी मी लोकसभेत व आमदार सत्यजित देशमुख यांनी विधानसभेत तुमचा आवाज बनून केलेल्या प्रयत्नामुळे हा सोनेरी क्षण आपल्या सर्वांनाच्या आयुष्यात आला.आपल्याला सर्वांच्यासाठी आमदार देशमुख यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे आपली वकिली पणाला लावली आहे.मात्र याचा अतिरेक होऊन देऊ नका.मिळालेले हे टिकवण्याची जबाबदरी तुमची आहे.
आमदार सदाभाऊ खोत म्हणाले,शिराळकरांची असणारी भावना पूर्ण करण्यासाठी सत्यजित देशमुख यांना आमदार व्हावे लागले. नागपंचमीच्या इतिहासात सत्यजित यांचे नावं सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक म्हणाले,आमदार सत्यजित देशमुख यांना विधानसभा निवडणूकसाठी दिलेल्या पाठिंब्याचा आमचा निर्णय चुकीचा नव्हता हे आज नागपंचमीच्या निर्णयाने सिद्ध झाले आहे.एक चांगला अभ्यासू व कर्तुत्वान आमदार मिळाल्याने सात महिन्यात विकासाला चालना मिळाली आहे.
यावेळी पृथ्वीसिंग नाईक,रणजितसिंह नाईक,गौरव नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले.स्वागत व प्रास्ताविक सम्राट शिंदे यांनी केले. यावेळी फत्तेसिंगराव देशमुख, प्रतापराव यादव,के.डी.पाटील, जयसिंगराव शिंदे,सुखदेव पाटील, संभाजी नलवडे, घन:शाम पाटील, अभिजित नाईक,विश्वप्रतापसिंग नाईक,संतोष इंगवले,सम्राट गायकवाड, अखिलेश पाटील, जगदीश कदम,अभिजित शेणेकर,सचिन नलवडे, बाबासो गायकवाड,स्वप्नील निकम,निलेश आवटे, कुलदीप निकम,बसवेश्वर शेटे, तानाजी पाटील,तानाजी कुंभार,अनिता धस,वैभवी कुलकर्णी,संगीता साळुंखे, अनिता देशमुख उपस्थित होत्या.
आभार सत्यजित पाटील यांनी मानले.
नाग आला आणि हत्ती गेला.
आपलं एक संकट टळतयं तो पर्यंत दुसर आलं.शिराळ्यात नाग आला.परंतु तो पर्यंत नांदणी येथील लोक भावना गुंतलेली हत्तीण गेली.नागा प्रमाणे आम्ही हत्तीन ही परत आणू असे आश्वासन खासदार माने यांनी दिले.
२० ठिकाणी सत्कार आणि रक्षाबंधन
मोटारसायकल रॅली काढून शिराळ्यात २० ठिकाणी आमदर सत्यजित देशमुख यांचा नागमंडळानी सत्कार करून महिलांनी राखी बांधली.
0 Comments