BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा डोंगरी उपगट निर्माण करा-आमदार सत्यजित देशमुख

 

  आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text
जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 शिराळा,ता.७:राज्यामध्ये डोंगरी भागाची संकल्पना विधानपरिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी पहिल्यांदा मांडली. यामध्ये संपूर्ण शिराळा तालुका डोंगरी तालुका म्हणून घोषीत  झाला. त्याच पद्धतीने  शिराळा विधानसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ४८  गावांचा डोंगरी उपगट निर्माण करावा. जेणेकरून या विभागातील लोकांना याचा फायदा होईल अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी विधिमंडळात केली.

   अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर आमदार सत्यजित देशमुख यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी देशमुख यांनी शिराळा मतदार संघातील अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.यावेळी आमदार देशमुख म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे गौरवशाली व्यक्तिमत्वा बाबत राज्यपाल यांनी आपल्या भाषणामध्ये गौरव केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न शिराळा येथील भुईकोट किल्ला येथे झाला. याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे अशी मागणी आम्ही केली आहे. या कामासाठी निधीस मंजुरी देखील झाली आहे. हे काम गतीने व्हावे. त्याचबरोबर संगमनेर नायरी, येथील भागाचा विकास व्हावा. 


विधानसभा मतदारसंघांमध्ये असणाऱ्या ४८  गावे ही शिराळा तालुक्यास लागून आहेत.शिराळा तालुका हा संपूर्ण डोंगरी तालुका आहे .त्याच पद्धतीने वाळवा तालुक्यातील ४८  गावांचा देखील डोंगरी उपगट म्हणून निर्मिती व्हावी. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. पर्यटनाच्या दृष्टीने चांदोली अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प,कोयना व आंबा या  ठिकाणी वन पर्यटन चा दर्जा देऊन त्याबाबतचे नियोजन करावे. मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना मिळालेल्या नोकरी मुदतवाढ देण्याबाबत शासनाने विचार करावा. राज्य शासनाने रेशीम उद्योगास प्रगती व प्रोत्साहन देण्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. शासनाने पायलट प्रोजेक्ट  जालना जिल्ह्यामध्ये केला आहे त्याच पद्धतीने पायलट प्रोजेक्ट शिराळा तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये असणाऱ्या खुंदलापूर,गुढे ,पाचगणी, मानेवाडी येथे करावा .जेणेकरून या ठिकाणीचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांनी विधिमंडळात केल्या मागण्याबाबत  शासन सकारात्मक निर्णय घेईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments