शिराळा,ता.२७ :बिऊर (ता.शिराळा) येथील ग्रामपंचायतने दोन वर्षाच्या कालावधीमध्ये १ कोटी ५३ लाख ८० हजार रुपयांची विकास कामे पूर्ण केली असल्याची माहिती सरपंच सौ. स्वाती राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पाटील म्हणाल्या , बिऊर ग्रामपंचायत मध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, तसेच विश्वास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकरराव पाटील , माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, ग्रामसेविका शुभांगी मस्के ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने सर्व कामे झाली आहे.
यामध्ये जलजीवन ५८ लाख, गोसावी समाज सभागृह १५, लाख. बेलकाटे वस्ती खडीकरण डांबरीकरण २०, लाख ,नाथफाटा ते पाटील मळा डांबरीकरण १५, लाख,गावातील अंतर्गत गटार ५, लाख, दलित वस्ती गटार व काँक्रीट १०, लाख, शांतीनगर अंगणवाडी शाळा ते प्रशांत पाटील घर काँक्रेट ४, लाख ,गावातील शाळा अंतर्गत सर्व शाळा दुरुस्ती ५, लाख, एम ,एस, ई, बी अंतर्गत गावातील कामे १०, लाख ,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे १०, लाख .
गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व्यवस्था १,लाख ८०, हजार यांचा समावेश आहे. १ कोटी २५ लाख रुपयांची कामे मंजूर झाली असून ती प्रगतीपथावर आहेत.जास्तीजास्त विकास कामे मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0 Comments