BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

यामुळे जिवंतपणी चौघांच्या खांद्यावर बसून उपचाराला जाण्याची वेळ

 


 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .


शिराळा,ता.२८:शिराळा तालुक्यातील कुसाईवाडी पैकी हुंबरवाडी येथील इंदुबाई परसू खोत(वय ८२) यांना मेंदू विकाराचा झटका आल्याने त्या बेशुद्ध पडल्या. निराधार असणऱ्या इंदुबाई  यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली. मात्र त्यांना पटकन उपचारासाठी घेवून जाण्यासाठी रस्ता तुटल्याने त्या ठिकाणी खासगी वाहन अथवा रुग्णवाहिका पटकन पोहचू शकत नसल्याने अर्धा किलोमीटर स्ट्रेचरद्वारे पायपीट करून वेळेत रुग्णवाहिकेत घालून उपचार सुरु केल्याने  त्यांचा जीव वाचला .मात्र रस्त्या अभावी इंदुबाई यांना जिवंतपणी चौघांच्या खांद्यावर बसून उपचाराला जावे लागले हे दुर्दैव आहे.

शिराळा पश्चिम भागात गेले आठवडाभर पावसाने सुरुवात केली आहे.शिराळा-कोकरूड या मुख्य रस्त्यावर बिळाशी हे गाव आहे.या गावापासूनचार किलोमिटर अंतरावर दुरंदेवाडी आहे.यावाडी पासून अर्धा किलोमीटर अंतरावर हुंबरवाडी आहे. १२ मे ला झालेल्या पावसामुळे दुरंदेवाडी ते हुंबरवाडी दरम्यान असणाऱ्या ओढ्यावरील रस्ता वाहून गेल्याने तिथे वाहने जात नाहीत.  गेल्यावर्षी पतीचे निधन झाले.पोटी मुलबाळ नसल्याने  इंदुबाई खोत  ह्या एकट्या राहतात.सकाळी दरवाजा का उघडला नाही म्हणून शेजारी असणाऱ्या लोकांनी तिथे जाऊन पाहिले असता त्यांना  मेंदू विकाराचा झटका आल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या.त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली.या घटनेची माहिती बाबासाहेब परीट यांनी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १०८ क्रमांकावर फोन द्वारे कळवली.त्या ठिकाणी रस्ता नसल्याने रुग्णवाहीका जात नाही त्यासाठी अर्धा कि.मी.पायी यावे लागेल याची पुर्व कल्पना दिली.नियंत्रण कक्षाने घटना समजुन घेतली व १०८ रुग्णवाहिकेच्या वाहकाला स्कुप स्ट्रेचर सोबत घेवून घटनास्थळी पोहचण्याची सुचना दिली.नियंत्रण कक्षाच्या सुचनेनुसार वाहक मारुती सावंत व डॉ.अनिल खुंटाळे घटनास्थळी पोहचले.स्थानिक नागरीक माजी सरपंच विनोद पन्हाळकर,बाबासाहेब परीट,ग्रामपंचायत सदस्य बाजीराव खोत,आनंदा शिंदे,शैलेश खोत,शिवाजी पवार नागरिकांच्या मदतीने वयोवृद्ध महिलेला स्ट्रेचरचा वापर करत १०८ रुग्णवाहिके पर्यंत आणले.डॉक्टरांनी महिलेची तपासणी करून  ऑक्सिजन देत इस्लामपुर येथिल खाजगी रुग्णालयात दाखल केले.८२ वर्षे वय असलेल्या रुग्णाला अत्यंत कठिण परिस्थितीत महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेने तत्काळ सेवा दिल्याने परिसरात १०८ रुग्णवाहिकेचे तत्पर सेवेचे कौतुक होत आहे. 
 गेले दहा वर्षात सांगली जिल्ह्यातील ३,१७,२२४ रुग्णांनी  महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला आहे. शिराळा तालुक्यातील दुर्गम भागात ही वेळेत  चांगल्या पद्धतीने सेवा मिळत असल्याचे इंदुबाई  खोत यांचे उत्तम उदाहरण आहे.  

डॉ. कौस्तुभ घाटुळे (जिल्हा व्यवस्थापक १०८   सांगली)

दुरंडेवाडी ते हुंबरवाडी दरम्यान ओढा आहे.त्या ओढ्यावरील रस्ता हा नुकत्याच १२ मे रोजी झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे.गेल्या वर्षी ही याच ठिकाणचा रस्ता वाहून गेला होता. आता रस्ता नसल्याने वाडीत चार चाकी वाहन जात नसल्याने रुग्णांची अशी गैरसोय होत आहे.त्यामुळे येथील रस्त्याचे काम त्वरित करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळणे गरजेचे आहे.
विनोद पन्हाळकर (माजी सरपंच)  

 

Post a Comment

0 Comments