शिराळा :आजच्या युगामध्ये सर्वच स्तरातून प्रगती साधायची असेल तर दळणवळणाची साधने असणे महत्वाचे आहे.सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग हा महत्त्वाचा असून शिराळा विधानसभा मतदारसंघांमध्ये अधिकारी पदाधिकारी यांचा समन्वय असल्यामुळे मतदारसंघातील सर्व रस्ते बारमाही डांबरीकरणाने जोडण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
शिराळा येथील ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल येथे सार्वजनिक बांधकाम विभागा मधील उपविभागीय अधिकारी प्रकाश विश्वासराव कदम यांच्या सेवानिवृत्ती समारंभावेळी ते बोलत होते.नाईक पुढे म्हणाले, शिराळा कदमवाडी सारख्या छोट्या वाडीमधील गरीब कुटुंबातून पहिली इंजिनिअरची पदवी घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये प्रकाश कदम यांना संधी मिळाली. त्यांच्या नोकरीच्या काळात अनेक प्रकल्प पूर्ण झाले. वेगवेगळ्या संकल्पना राबवणारे अधिकारी म्हणून पाटील यांनी ओळख निर्माण केले आहे.तीस वर्षाच्या सेवेमध्ये कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी शाखा अभियंता ते उपअभियंता या पदावर चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून काम झाले आहे. अधिकारी व पदाधिकारी एकत्रित समन्वय होता म्हणून शिराळा मतदारसंघातील सर्व रस्ते बारमाही डांबरीकरणाने जोडन्यामध्ये यश आले आहे.
यावेळी सहकार बोर्ड माजी अध्यक्ष सुखदेव पाटील,वारणा साखर सचालक विजय पाटील, कार्यकारी अभियंता के डी मुधाळे,उप अभियंता पी व्ही चौधरी,तानाजी पाटील,संजय जाधव, रणजीत पाटील,प्रदीप कदम,आनंद पाटील देवर्डे,अजिंक्य कदम, राजू पाटील,अखिलेश पाटील ,धनंजय देशपांडे, रणजित कदम, पी .एस पाटील,अशोक पाटील, धनाजी नरुटे, जगदीश कदम ,अक्षय कदम, आबा खाबाले,संदीप मिसाळ, धनाजी शिनगारे उपस्थित होते.
0 Comments