शिराळा,ता.२२: रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती सर्व श्रेष्ठ आणि घट्ट असता असे म्हटले जाते. ही नाती जातीपातीच्या पलीकडे जीवापाड जपली जातात.त्यासाठी गरीब ,श्रीमंत,छोटा,मोठा असा कोणताही भेदभाव केला जात नाही. अशी नाती जपणारी माणसं हाताच्या बोटावर मोजण्याएवढी असता .त्या पैकी एक म्हणजे आमदार सत्यजित देशमुख. आपल्या घरात काम करणाऱ्या गोसावी समाज्यातील महिलेला आपली बहिण मानून तीच्या मुलीच्या लग्नात मामा म्हणून लिंबू धरून ही मानलेल्या नात्याची वीन घट्ट करून नाती फक्त जोडत नाही तर ती निभावतो हे कृतीतून सिद्ध केले आहे.या मंगलमय समयी घडलेल्या प्रसंगाने उपस्थिती जनसमुदाय भरवून गेला तर गोसावी कुटुंबियांच्या डोळ्याच्या कडा आनंदाश्रुनी ओलावल्या अभिमानाने आणि गर्वाने त्यांचा उर भरून आला.
कोकरूड येथील गोसावी समाज्यातील कमळाबाई ह्या स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या कोकरूड येथील निवासस्थानी कामास ५० वर्षे होत्या.त्या अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असल्याने देशमुख कुटुंबातील एक घटक बनल्या.त्यामुळे सरोजनी देशमुख व शिवाजीराव देशमुख यांनी त्यांना आपली मुलगी मानली. त्यानंतर त्यांचे निधन झाल्याने तिथे त्यांची मुलगी अनिता हिने काम करत होती.त्यांनी तिचे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.तीने ही आपल्या आईचा प्रामाणिकपणे काम करण्याचा वारसा कायम जोपासला.त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी तीचे लग्न त्यांच्या उद्योग समूहात काम करणाऱ्या बिऊर येथील बजरंग गोसावी याच्या सोबत २००१ ला लावून दिले. सत्यजित देशमुख यांनी अनिताला आपली बहीण मानली होती. त्यांचा हा ऋणानुबंध कायम आहे.
आज अनिता व बजरंग गोसावी यांची मुलगी गायत्री हिचा शिराळा येथील अक्षय गोसावी यांच्या सोबत भाटशिरगाव येथील लायन्स हॉल विवाह होता. या विवाह सोहळ्यासाठी मुलीचा मामा म्हणून लिंबू धरण्यासाठी आमदार सत्यजित देशमुख उपस्थिती होते. गोसावी समाज्यातील मुलीचा मामा म्हणून देशमुख घराण्यातील आमदार उभा राहिलेले पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या .त्याचं बरोबर आमदार सत्यजित देशमुख यांच्या मनाचा मोठेपणा व नातं कसं जपलं जातं याची प्रचिती लग्न समारंभासाठी उपस्थिती असणाऱ्या लोकांना आली.
साधेपणा जाणवला
लग्न समारंभास अनेक राजकीय नेत्यांना बोलवलं जातं.नेते ही त्यास आवर्जून उपस्थित राहतात.काही वेळा जवळचा कार्यकर्ता किंव्हा नातलग असेल तर अर्थिक मदत करतात.मात्र आमदार सत्यजित देशमुख यांनी मी आमदार असून गरीब कुटुंबातील आणि ते ही गोसावी समाज्यातील मुलीच्या लग्नात मामा म्हणून लिंबू कसा धरणार याचा मनात संकोच न बाळगता इतर मानपान करत आपले मामाचे कर्तव्य पार पाडले. हाच त्यांचा सर्वांना साधेपणा जाणवला.
0 Comments