शिराळा:खुंदलापूर धनगरवाडा गावाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू. शेतकऱ्यांच्या जमिनीवरील संपादन शेरा काढण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाकडून झाला आहे.त्यामुळे निवडणुक काळात जनतेला दिलेला शब्द सार्थ ठरवला असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
खुंदलापूर (ता.शिराळा) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, कोकरूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव,राम माने,कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले,खुंदलापूर गावाने भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवत. मला एक मुखी मतदान केले. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. पक्षीय पातळीवर यांची दखल घेतली आहे. या गावाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा निश्चय केला होता. त्याप्रमाणे आज तो पूर्णत्वास येत असून शेतकऱ्यांची ६८४ हेक्टर जमीनी वरील वन विभागाचा संपादन शेरा कमी करण्याचा निर्णय झाला आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार असून केंद्राकडून देखील यास मंजुरी मिळून घेऊ . या मतदारसंघाच्या विकासासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न सुरू असून चांदोली पर्यटन वाढीसाठी या विभागाचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहे.
यावेळी सरपंच आकाराम गावडे, उपसरपंच गंगाराम गावडे, पोलीस पाटील धाकलू गावडे, माजी सरपंच तुकाराम गावडे, सिताराम गावडे, रामचंद्र गावडे भैरू गावडे, नाना पाटील,अशोक सोनार आदी सह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments