शिराळा,ता.१: भाटशिरगाव ग्रामपंचायतीला बेकायदेशीररित्या टाळे ठोकून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यावर ग्रामपंचायत अधिकारी सचिन मोरे यांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गेले दोन दिवसा पासून भाटशिरगाव ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे शिराळा पंचायत समिती कार्यालयासमोर भर पावसात बेमुदत आंदोलन सुरू आहे.
आपल्या मागणीसाठी काल सोमवारी ३० जून पासून शिराळा पंचायत समिती कार्यालयासमोरआंदोलन सुरु केले आहे.आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता.सायंकाळी ४ पासून आंदोलनाची तीव्रता वाढवून आंदोलकांनी नवीन पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या मारला. जो पर्यंत प्रशासन संबंधीतावर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशउपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी आंदोलनास भेट दिली. यावेळी नाईक यांनी शिराळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करुन आंदोलकांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करुन ग्रामपंचायतीस टाळे ठोकणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, शिराळा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड. रवी पाटील, सुनंदा दूधचे संचालक सागर पाटील, युवक क्रांती, शिराळा- वाळवाचे समन्वयक अमोल पाटील, खिरवडेचे सरपंच प्रमोद पाटील, शिराळा बाजार समितीचे संचालक पांडुरंग गायकवाड, माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल साळुंखे यांनी आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला.
याप्रसंगी भाटशिरगांवचे सरपंच भगवान भंडारे, उपसरपंच संजय देसाई, सदस्या कमल देसाई, वैशाली आलुगडे, संपतराव देशमुख, सर्जेराव देसाई, भिमराव देसाई, बाजीराव देसाई, दत्तात्रय पाडळकर, अजित देसाई,अनिल आलुगडे, विक्रम देसाई, भगवान देसाई, सुरेश भंडारे, नाना देसाई, मंगल भंडारे, अंजना भंडारे, राजराणी देसाई, स्वाती देसाई, विमल देसाई, पूजा देसाई, शनिराज आलुगडे, सिद्धांत देसाई, सतीश भंडारे, युवक क्रांतीचे समन्वयक कैलास देसाई उपस्थित होते.


.jpg)

0 Comments